‘समस्या सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरा’   

पुणे : जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाची वाट पाहू नका, थेट रस्त्यावर उतरून नागरिकांचे प्रश्न सोडवा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी कार्यकर्त्यांना दिला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा १० जून रोजी वर्धापन दिन बालेवाडी येथे साजरा करण्यात येणार आहे. यासाठी शनिवारी पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते बैठक घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना प्रदिप देशमुख बोलत होते. 
 
पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या जिल्ह्यात होणारे अधिवेशन न भूतो न भविष्यती झाले पाहिजे. या दृष्टीने प्रत्येक सदस्याने काम करावे असे आवाहन देशमुख यांनी केले. महानगरपालिकेच्या  निवडणुकाकधीही जाहीर होऊ शकतात. पक्षाची सदस्य नोंदणी वाढली पाहिजे. पण त्यापुढे जाऊन प्रत्येक कार्यकर्त्याने थेट जनतेत जाऊन काम केले पाहिजे. अजित पवारांचा विकासाचा विचार घेऊन आपण काम करत आहे, हे नागरिकांना दिसले पाहिजे, असे देशमुख यांनी नमूद केले. 
 
आमदार चेतन तुपे म्हणाले, कार्यकर्ता हाच पक्षाचा पाया आहे. त्याच्यामुळेच पक्षाला यश मिळाले आहे. त्यामुळे विविध महामंडळे, समित्या यावर संधी द्यायला हवी. मात्र आपण महायुतीमध्ये आहोत. काही फॉर्म्युला ठरला आहे, हे आपण लक्षात ठेवायला हवे.  यावेळी  राजलक्ष्मी भोसले, महेश शिंदे, बाबुराव चांदेरे, सुभाष जगताप, दत्ता सागरे, दत्ता धनकवडे, सुभाष जगताप, वासंती काकडे, बाबुराव चांदेरे, महेश शिंदे, दत्ता सागरे, बाबा धुमाळ, नंदा लोणकर, अक्रूर कुदळे, प्रमोद निम्हण, सुषमा निम्हण, उषा कळमकर, शशिकला कुंभार, संतोष फरांदे, प्रदीप गायकवाड, शांतीलाल मिसाळ, शैलेश चरवड, रोहिणी चिमटे, हिना मोमीन, जतिन कांबळे, बाबा पाटील, संतोष नांगरे, विनोद पवार, शुभम माताळे, शितल मेदने, राहुल गुंड, पंकज साठे, अशोक जाधव, पुनम पाटील, संगीता बराटे, रूपेश आखाडे, लावण्या शिंदे, सुशांत ढमढेरे उपस्थित होते.

Related Articles